Posts

Showing posts from June, 2022

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश... ३७८ हेक्टर शेतजमीन येणार ओलिताखाली

Image
  निविदाप्रक्रिया सुरु झाल्याने लवकरच होणार कामांना सुरुवात ... ---------------------------------------- चाळीसगाव – शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी त्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे आणि उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याच उद्देशाने चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने तालुक्यातील १५ गावांना १९ सिमेंट बंधारे बांधकामासाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सांगवी व बहाळ येथे प्रत्येकी ३ तसेच चांभार्डी, दसेगाव, राजदेहरे, कुंझर, रांजणगाव, कळमडू, पिंपळवाढ म्हाळसा, पाटणा, दडपिंप्री, पिंपरखेड, खडकी, डोणदिगर, खराडी येथे प्रत्येकी १ असे एकूण १९ सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम होणार आहे. यामुळे जवळपास ३७८ हेक्टर क्षेत्रावरील शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. मे महिन्यात शासन निर्णय आणि जून महिन्यात निविदाप्रक्रिया... यासंदर्भातल्या निर्णयाचे पत्र महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ मार्फत दि.११ मे २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पाठपुरावा करत याबाबतची जून महिन्यातच ई-निविद...

वडाळा येथे तलाव निर्माणाचा शुभारंभ

Image
एपिरॉक मायनिंग,नाम फाऊंडेशन,भुजल अभियान व शेतकरी सहभागातून वडाळा येथे तलाव निर्माणाचा शुभारंभ वडाळा प्रतिनिधी : एपिरॉक मायनिंग इंडिया लिमिटेड व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व शेतकरी सहभागातून आणि भूजल अभियानाच्या सौजन्याने, एपिरॉक अमृतधारा कार्यक्रमाअंतर्गत वडाळा येथे "१ गाव १ तलाव" उपक्रम व तलाव निर्माण कार्याचा शुभारंभ करण्यात आला.          चाळीसगाव तालुक्यात एपिरॉक मायनिंग इंडिया लिमिटेड व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व शेतकरी सहभागातून एपिरॉक अमृतधारा कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यात ७ तलाव होणार आहेत. एपिरॉक मायनिंग इंडिया लिमिटेड कंपनी चे धनाजी पुरी सर, नाम चे गणेश जी थोरात यांनी भूजल अभियानाच्या भूजल वारकरी टीम सोबत ७ गावांमध्ये तलाव पाहणी साठी शिवार फेरी केली. शिवार फेरी झाल्या नंतर वडाळा या गावात तलावाच्या कामाचा शुभारंभ आज दिनांक १४ जून रोजी  गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.गावात या कामाचा मोठ्या प्रमाणात उत्साह असून शेतकरी या कामासाठी लोक सहभाग जमा करत आहेत.तलावातील सुपीक गाळ शेतकरी स्वखर्चाने बांधावर टाकून घेत आहे ज्यामुळे जमिनीच...