Posts

Showing posts from July, 2022

गुरुपौर्णिमा : गुरू आणि शिष्याचे नाते जसे कृष्ण आणि अर्जुन, कृष्ण आणि द्रौपदी

Image
  आज गुरू पौर्णिमा.. गुरू पौर्णिमा म्हटलं की आपला गुरु बद्दल असलेला आदर व्यक्त करण्याचा दिवस.   खरं तर आपल्या देशाला गुरुशिष्य परंपरेची खुप मोठी आणि पवित्र संस्कृती लाभलेली आहे. महाभारत काळात तर या गुरुशिष्य परंपरेची प्रत्येक प्रसंगात प्रचीती येते. जसे की अर्जुन आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्यातील संवाद असतील किंवा श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील जिव्हाळा. आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गुरू आपल्याला अनेक लहान, मोठे, थोर अश्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभत असते. अश्या व्यक्तींचा आदर आपण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनात केलाच पाहिजे. आपण पोटात असल्या पासून तर आपण जन्माला आल्यावर आपल्याला चालणे शिकवते, बोलणे शिकवते, प्रत्येक व्यक्तीची ओळख, ही आपल्याला आई च प्रथम गुरू बनून देत असते. जीवनातील सर्वात मोठा अमुल्य ठेवा म्हणजे गुरू. जो जो गुरू शी एकरूप झाला त्याचा उद्घारच झाला आहे. भाग्य आणि कर्म जुडून आले की आपल्याला गुरू ची प्राप्ती होते. शिष्य असा भक्त असला पाहिजे गुरू चा की गुरू जे करणार ते माझ्यासाठी सदैव योग्य च असणार असा असीम विश्वास ठेवणारा.          शिष्य आणि...

निराधार योजना लाभार्थ्यांना आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयात मोफत दाखले उपलब्ध होणार

Image
चाळीसगाव प्रतिनिधी: शासनाच्या नवीन निर्देशानुसार चाळीसगाव तालुक्यातील १४ हजाराहून अधिक संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना २१ हजारांचे उत्पन्न दाखले तहसील कार्यालयात जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे वृद्ध, विधवा, अपंग आदी निराधारांची मोठी गैरसोय होत असून कागदपत्रे घेऊन ऊन असो पाऊस असो सदर लाभार्थ्यांना २१ हजाराचा उत्पन्न दाखला काढण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. लाभार्थ्यांच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन काही दलालांनी त्यांची आर्थिक पिळवणूक सुरू केल्याच्या तक्रारी आ.मंगेशदादा यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आमदारांनी तातडीने तहसील कार्यालयात व परिसरात सेतू केंद्र येथे भेट दिली व तेथील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी काही वृद्ध महिला लाभार्थ्यांनी सांगितले की आम्ही आपले काम लवकर होईल या आशेने सकाळी उपाशीपोटी चाळीसगाव येथे आलो मात्र आता ४ वाजले तरी आमचे काम झाले नाही. काही दलालांनी तुमचे काम करून देतो म्हणून आमच्याकडे ५०० रुपये मागितले मात्र आम्ही महिन्याला १००० रुपये कधी मिळतील म्हणून अनेक महिने वाट पाहणार लोक, यांन...