Posts

Showing posts from April, 2021

राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही, राजेश टोपे यांची माहिती

Image
राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 मे पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही. खान्देश न्यूज नेटवर्क: राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 मे पासून राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या 1 मे रोजी राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.             राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुषंगाने प्रत्येकाला लस मिळेल. तसेच येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे, असं टोपे यांनी सांगितलं. अपॉईंटमेंट सक्तीची लसीकरण करण्यासाठ...

फैजपूर शहरात शासकीय कोवीड लसीकरण केंद्र सुरू करावे-नारिशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांची मागणी

Image
ऐतिहासिक फैजपुर शहरात शासकीय कोवीड लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करावे खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी यांची आमदार, प्रांताधिकारी व मुख्याधिकारींकडे मागणी   खान्देश न्यूज नेटवर्क: गेल्या वर्षभरापासून कोरोना या भीषण आजाराने संपुर्ण जगात थैमान घातले आहे.यामधे लाखो लोकांचे जीव गेले असुन या आजारात फैजपूर शहरातील देखील अनेक निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.या भयंकर आजारांपासून बचावासाठी केंद्र सरकारने महत्वकांक्षी कोविड लसिकरण मोहीम हाती घेतली असून ग्रामीण तसेच शहरी भागासह संपूर्ण महाराष्ट्रात ही लसिकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.अपवाद आहे तो फक्त फैजपूर शहराचा.म्हणून लवकरात लवकर शहरात शासकीय कोवीड लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी नारिशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी आ.शिरीष चौधरी, प्रांताधिकारी कैलास कडलग व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याकडे केली आहे.          ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणून ओळख असलेल्या फैजपूर शहरात मात्र अजुनपर्यंत शासकीय लसिकरण केंद्र सुरू करण्यात आलेले नाही.शहराच्या लोकस...

चाळीसगावी गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लि. उभारणार प्राणवायू निर्मिती प्रकल्प

Image
चाळीसगावी गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लि. उभारणार प्राणवायू निर्मिती प्रकल्प यापूर्वी देखील चाळीसगाव ट्रामा केअर सेंटर ला गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट कंपनीने 10 बेड, 10 मेटरेस, 10 आयसीयु मोनिटर, व 4 ऑक्सिजन स्वनिर्मित मशीन वितरित केलेल्या आहेत. संदिप पाटील चाळीसगाव: कोरोना महामारी च्या वाढत्या पार्श्वभूमीवर सध्या चाळीसगाव शहरासाठी इतर जिल्ह्यांतून तसेच विविध राज्यांतून ऑक्सिजन चा पुरवठा करण्यात येत आहे पण मागणी वाढल्याने कोरोना रुग्णांना ऑक्सीजन कमी पडू नये यासाठी चाळीसगाव  (खडकी) एम.आय.डी.सी.येथील गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेड कंपनी ने स्वतःहून पुढाकार घेत ऑक्सिजनचा पुरवठा कायम स्वरूपी  होण्याकरिता चाळीसगाव येथील नवीनच असलेल्या ट्रामा केअर केंद्र आवारात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प युनिट उभारून देणार आहे.         प्लांटची ऑक्सिजन निर्मिती क्षमता ही  210 लिटर पर मिनिट इतकी राहणार असून 50 ते 60  रुग्णांकरिता नियमितपणे ऑक्सिजनचा पुरवठा  होणार आहे. यापूर्वी देखील  चाळीसगाव ट्रामा केअर केंद्राला  गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट कंपनी...

राज्यात उद्यापासून नविन नियम लागू-सकाळी ७ ते ११ पर्यंतच उघडी राहतील 'ही' दुकाने.

Image
खान्देश न्यूज नेटवर्क: राज्यातील गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता  सरकारनं आता नवी नियमावली जारी केलीय. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेत, जे 1 मे 2021 च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केलेत.  आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदीनुसार सदर बदल साथीचे रोग कायदा 1897 च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदीनुसार सदर बदल करण्यात येत असल्याची माहिती पत्रकाद्वारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. 20 एप्रिल 2021 संध्याकाळी आठ वाजेपासून 1 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत अस्तित्वात राहतील. काय सुरू आणि काय बंद ?   सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे आणि कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने, पावस...

सर्व किराणा दुकान सकाळी ११ वाजेपासून होणार बंद राज्यात अजून कडक निर्बंध -आरोग्यमंत्री

Image
 महाराष्ट्रात राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत.आता त्यात सरकारने किराणा मालाच्या दुकांनांना देखील सकाळी ७ ते ११ या वेळेतच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.   याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले,         'लोकं किराणाच्या नावाखाली विनाकारण फिरताना दिसत आहेत. लोकांनी बिनाकामाचं फिरणे टाळले पाहिजे. त्यासाठी सकाळी ७ ते ११ या चार तासांसाठी किराणा मालाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. सध्या ३० तारखेपर्यंत संचारबंदी अधिक जास्त कडक करण्याची गरज आहे.'      अशा प्रकारचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.यामुळे आता राज्यातील किराणा मालाची दुकाने ठराविक वेळेसाठीच उघडी राहणार आहेत.          महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजन बेड्स, यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांतून किराणा मालाच्या दुकांनांना सूट देण्याता आली होती. मात्र त्याचा गैरफायदा घेत का...

कोरोना बाधीत पत्रकारांना मोफत उपचार व मृतांना ५० लाख मदत मिळावी-सावदा पत्रकार असोसिएशन ची मागणी

Image
कोरोना पत्रकारांना मोफत उपचार व मृतांना ५० लाख मदत मिळावी-सावदा पत्रकार असोसिएशन ची मागणी फैजपूर प्रतिनिधी: सावदा परिसरासह राज्यभरातील कोरोना काळात वृत्तसंकलन करण्यासाठी घराबाहेर पडताना जीवाची ही पर्वा न करता कोरोना काळात वृत्तसंकलन करणार्या पत्रकार बांधवांना कोरोना लागण झाल्यास मोफत औषधोपचार मिळावेत तसेच पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी अशा मागणीचे निवेदन फैजपूर प्रांताधिकारींना सावदा येथील ताप्ती सातपुडा जर्नलीस्ट असोसिएशन व इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन यांच्या वतीने देण्यात आले आहे.       कोरोना या महामारीने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. अशा बिकट वातावरणात सर्व पत्रकार हे आपले कर्तव्य म्हणुन जोखिम पत्करुन वृत्त संकलासाठी फिरत असतात. त्यामुळे, देशासह राज्यात असंख्य पत्रकारांना कोरोना ची बाधा होऊन काही मयतही झाले आहेत. नुकतेच कैलास परदेशी रा. सावदा, परशुराम बोंडे, विजय घोरपडे रा. भुसावळ यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास ७ ते ८ पत्रकारांचा आणि राज्यभरातील ७० ते ८० पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पत्रकार हे मानसेवी तत्वावर क...

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करा 'हे' आयुर्वेदिक उपाय नक्की वाढेल रोगप्रतिकारक शक्ती!

Image
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करा 'हे' आयुर्वेदिक उपाय नक्की वाढेल रोगप्रतिकारक शक्ती! खान्देश न्यूज नेटवर्क : रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरास रोगांविरूद्ध लढायला मदत करते. हे शरीरातून रोगजनक आणि जीवाणू काढून टाकण्याचे काम करते. इतकेच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर फक्त कोरोनाच नाहीतर इतरही आजारांपासून आपण दूर राहू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी, निरोगी खाण्याबरोबरच निरोगी जीवनशैली देखील महत्वाची आहे.         देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. या कोरोनाच्या काळात  आजारांपासून दूर राहणे आता गरजेचे झाले आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे चांगली रोगप्रतिकारक शक्ती यासाठी आपल्याला चांगला आणि हेल्ही आहार घ्यावा लागणार आहे. जेणे करून आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.         - आपल्या आहारात दररोज आले खा. आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट असतात जे चयापचय वाढविण्याचे काम करते. हे खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच इतरही आजारांपासून ...

अखेर राज्यात लॉकडाऊन जाहिर: बुधवारी रात्री 8 वाजेपासून कलम 144 लागू होणार

Image
*बुधवारपासून 15 दिवस महाराष्ट्रात संचारबंदी, *काय सुरु, काय बंद राहणार? *मुख्यमंत्र्यांकडून 5400 कोटींच्या पॅकेजची घोषणा; *घरेलू कामगारांपासून ते रिक्षा चालकांपर्यंत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बघा कुणाला किती पैसा मिळणार? खान्देश न्यूज नेटवर्क: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना राज्यातील कोरोनाची माहिती देताना उपाययोजनांचेही तपशील सांगितले. तसेच बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यभर संचारबंदी लागू असणार आहे, अशी घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या. त्या पुढीलप्रमाणे, महत्वाचे १० मुद्दे- 1. 100 टक्के ऑक्सिजनचा उपयोग वैद्यकीय कारणांसाठी होणार. सध्या महाराष्ट्रात 950-1000 टन ऑक्सिजनचं उत्पन्न होतं. 2. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील इतर राज्यांमधूनही ऑक्सिजन आणण्याची परवानगी दिली. रस्त्याने ऑक्सिजन आणताना लष्कराच्या, वायू दलाच्या मदतीने हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी परवानगी द्यावी आणि व्यवस्था करावी अशी मागणी पंतप्रधानांक...

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यातील ६ गावांना व्यायामशाळा मंजूर,

Image
उपखेड, खरजई, आडगाव, चितेगाव, वरखेडे बुद्रुक, खडकीसीम गावांना मिळणार प्रत्येकी ७ लक्ष निधी सुदृढ व निरोगी पिढी घडविण्यासाठी युवाशक्तीला सकारात्मक चालना देणे गरजेचे – आमदार मंगेश चव्हाण खान्देश न्यूज नेटवर्क चाळीसगाव:  जिल्हा वार्षिक योजना सन २०२० – २१ व्यायामशाळांचा विकास या लेखाशीर्ष अंतर्गत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यातील ६ गावांना व्यायामशाळा बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला असून तशी प्रशासकीय मान्यता देखील जिल्हाधिकारी यांनी नुकतीच दिली आहे. यामुळे तालुक्यातील उपखेड, खरजई, आडगाव, चितेगाव, वरखेडे बुद्रुक, खडकीसीम या गावांना प्रत्येकी ७ लक्ष प्रमाणे एकूण ४२ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे सदर गावांमध्ये सुसज्ज अशी व्यायामशाळा इमारत उभी राहणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.      "मी ग्रामीण भागातून आलेला तरुण असल्याने तरुणांना शारीरिक कसरतीसाठी काय अडचणी येतात हे मी जाणून आहे. तरुणांच्या शक्तीला सकारात्मक चालना देण्यासाठी व्यायामशाळा हे गावात महत्वाचे केंद्र बनावे यासाठी गावातील सुजाण नागरिकांनी एक...

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या,जाणून घ्या कधी होणार परिक्षा?

Image
आता बारावीची परीक्षा मे अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहेेेेेेेे  राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीची परीक्षा  पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हेलकावे खात असलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसमोरील चित्र स्पष्ट झाले आहे. काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी आत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बराच खल झाला. सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. अखे...

लॉकडाऊन अटळ आहे पण हातावर पोट असणाऱ्यांसाठी काही करावं लागेल : बाळासाहेब थोरात

Image
लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असं मला वैयक्तिक वाटते. तसं केलं नाही तर हा संसर्ग वाढत जाईल, असं बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं. खान्देश न्यूज नेटवर्क : कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे वाढत चालले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री, विरोधक आणि तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. लवकरच याबाबत निर्णय झाला पाहिजे, असे महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.ते एका खासगी  वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.          लॉकडाऊनमध्ये कामगारांना काय मदत द्यायची याबाबत अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा केली जाईल. हातावर पोट आहे त्यांच्याकरिता काही करावं लागेल. लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असं मला वैयक्तिक वाटते. तसं केलं नाही तर हा संसर्ग वाढत जाईल, असंही थोरातांनी नमूद केलं. Advertisement            आपण गेल्यावेळी दररोज 10 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. बाहेरच्या राज्यातील मजुरांची व्यवस्था केली. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चांगलं काम झालं. केंद्राने काय पॅकज दिलं आम्हाला समजलं नाही, असा आरोप थोरातांनी भाजपवर केला.   ...

फैजपूर येथील रहिवासी व कोचूर जि.प.शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका स्मिता चौधरी यांचे दुःखद निधन

Image
फैजपूर येथील रहिवासी व कोचूर जि.प.शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका स्मिता चौधरी यांचे दुःखद निधन फैजपूर प्रतिनिधी: फैजपूर येथील रहिवासी व कोचूर जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका स्मिता सचिन चौधरी यांचे कोरोनाचे उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.चौधरी कुटुंबात २२ दिवसांपूर्वी सासरे,माजी सैनिक हेमचंद्र नामदेव चौधरी यांचे निधन झाले व लागोपाठ त्यांच्या सुन स्मिता चौधरी यांचेदेखील निधन झाल्याने चौधरी व राणे परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे.             स्व.स्मिता चौधरी ह्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.आशा सुरेश राणे यांच्या कन्या तर वरणगाव आयुध निर्माणी चे कर्मचारी सचिन चौधरी यांच्या पत्नी होत्या.फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांच्या त्या आतेबहीण होत.स्मिता यांचा शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व वैज्ञानिक या विषयांचा गाढा अभ्यास होता त्यामुळे विविध क्षेत्रातील महिला वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांची भेट घेत असत.त्यांच्या गोड व मनमिळाऊ स्वभावामुळे थोड्याच वर्षांत त्यांनी नावलौकि...

लॉकडाऊन: मुख्यमंत्री 14 एप्रिलला लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Image
आधी अर्थ विभागाशी, कॅबिनेट बैठकीत चर्चा, नंतर मुख्यमंत्री 14 एप्रिलला लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करणार : राजेश टोपे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 14 एप्रिलला कॅबिनेट बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत घोषणा करतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली खान्देश न्यूज नेटवर्क : राज्यात कोरोनाबाधितांचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. राज्यात रविवारी (11 एप्रिल) दिवसभरात तब्बल 63 हजारांपेक्षाही जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 14 एप्रिलला कॅबिनेट बैठकीनंतर याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (11 एप्रिल) राज्याच्या टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. या बैठकीत लॉकडाऊन विषयी चर्चा झाली. टास्क फोर्समधील जवळपास सर्वच तज्ज्ञांचं मत हे लॉकडाऊन लागू करावं, याच बाजूने आहे. या बैठकीत...

पुणेकरांना खुशखबर! मोदी सरकारने पाठवले कोरोना लसचे गिफ्ट

Image
पुणेकरांना खुशखबर! मोदी सरकारने पाठवले कोरोना लसचे गिफ्ट खान्देश न्यूज नेटवर्क: एकीकडे महाराष्ट्र सरकार लस पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर आरोप करत असताना केंद्र सरकारकडून मात्र पुणे जिल्ह्यासाठी एक विशेष भेट देण्यात आली आहे. केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरु केला आहे. या लसीचा पहिला हफ्ता शुक्रवारी पुण्यात दाखल झाला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही खुशखबर पुणेकरांना दिली आहे. महाराष्ट्रात सध्या भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. देशातील अंदाजे ६०% कोरोना रुग्ण संख्या महाराष्ट्रात आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यातही सगळ्यात वरती आहे तो पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. पण अशातच पुणेकरांना आता थेट केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा होणार आहे. Advertisement          या लसींचा पहिला हफ्ता शुक्रवारी पुण्यात पोहोचला. या पहिल्या हफ्त्यात पुणे जिल्ह्याला २ लाख ४८ हजार लसी पुरवण्यात आल्या आहेत. तर रविवारी ल...

शिष्याने केला गुरुवर कोरोनाचा उपचार- डॉ. नी. तू. पाटलांनी शासकिय रुग्णालयात घेतले उपचार

Image
शिष्याने केला गुरुवर कोरोनाचा उपचार - डॉ. नी. तू. पाटलांनी शासकिय रुग्णालयात घेतले उपचार खान्देश न्यूज नेटवर्क भुसावळ:  डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात एमबीबीएसच्या अखेरच्या वर्षांत प्राध्यापक असलेल्या डॉ. नी. तू. पाटील यांचा डॉ. मयुर नितीन चौधरी हा आवडता विद्यार्थी. याच आवडत्या विद्यार्थाने आता डॉ. नी. तू. पाटील कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर त्यांच्यावर उपचार करुन एकप्रकारे गुरुदक्षिणा दिली. डॉ. पाटील यांनीही शासकिय रुग्णालयात भरती होऊन शासनाच्या सेवांवर अतुट विश्वास दाखवला.          नेत्ररोगतज्ज्ञ तथा भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांना २२ मार्चपासून कोरोनाचे लक्षणे जावून लागली. औषधोपचार सुरु केल्यानंतर ३० एप्रिल रोजी एचआरसीच्या रिपोर्टमेंट फुफुसात ४५ ते ४८ टक्के इन्फेक्शन असल्याचे आढळून आले. यापूर्वीच संपर्कात असलेल्या ग्रामिण व ट्रामा सेंटरचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. मयुर चौधरी यांना संपर्क साधून त्यांनी ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला. अनेक खासगी हॉस्पीटलचा पर्याय समोर होतो, मात्र ...

महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागणार? मंत्री वडेट्टीवार यांचं सुचक विधान

Image
महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागणार? मंत्री वडेट्टीवार यांचं सुचक विधान   खान्देश न्यूज नेटवर्क :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , मनसे अध्यक्ष राज ठाकरे, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचा पर्याय सरकारकडे आहे. मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका काय हे जाणून मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.                 महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. राज्यातील प्रत्येक शहरात दररोज हजारांच्या घरात कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. मृत्यूदरही वाढल्याने स्मशानभूमी फुल्ल झाल्या आहेत. आणि त्यामुळे कधी एकाच सरणावर 8 मृतदेह तर कधी एकावेळी 22 मृतदेहांना अग्नी द्यावा लागतो. त्यामुळेच कडक पावलं उचलण्याची गरज असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री...

वजन कमी करण्यासाठी आजपर्यंतचा सर्वात भारी उपाय… फक्त हे कोमट पाण्यात टाकून प्या… चरबी धडा धड जळून जाईल…

Image
वजन कमी करण्यासाठी आजपर्यंतचा सर्वात भारी उपाय… फक्त हे कोमट पाण्यात टाकून प्या… चरबी धडा धड जळून जाईल… खान्देश न्यूज नेटवर्क:  सकाळी उठल्यावर या प्रकारे कोमट पाणी प्या. तुमच्या शरीरावर साठलेली अतिरिक्त च र बी जळून जाईल. तुमचं वजन खात्रीशीर कमी होईल.याचा महत्वाचा फायदा म्हणजे याने एलडीएल कोले स्ट्रॉ ल म्हणजेच लो डेन्सीटी लिपो प्रोटीन ज्याला म्हणतो, बॅड कोले स्ट्रॉल, ज्याच्यामुळे नसा ब्लॉ क होण्याचा धोका होतो, हा र्ट अटॅ क चा धोका निर्माण होतो तो कमी होईल.        आपल्या शरीरात एचडीएल ज्याला आपण हाय डेन्सी टी लिपो प्रोटीन जे व्हिटॅ मिन डी साठी आवश्यक असतं, ते आपल्या शरीरात चांगल्या प्रकारे वाढेल. त्याच बरोबर व्हिटॅ मिन डी ची कमतरता निघून जाईल.पोटाच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील त्या सुद्धा पूर्णपणे कमी होतील. मित्रांनो पोटात जळजळ होणे, अपचन होणे यासारख्या समस्या दिसायला लहान असल्या तरी याचा मोठा त्रास आपल्या शरीराला होत असतो. Advertisement       याच्या वापराने आपली रोग प्रतिकार शक्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल. मित्रांनो हा...

शेतकऱ्यांना तुरुंगात डांबणाऱ्या आघाडी सरकारचे श्राद्ध करुन आ.मंगेश चव्हाणांसह शेतकऱ्यांनी केले मुंडन

Image
शेतकऱ्यांना तुरुंगात डांबणाऱ्या आघाडी सरकारचे श्राद्ध करुन आ.मंगेश चव्हाणांसह शेतकऱ्यांनी केले मुंडन खान्देश न्यूज नेटवर्क: ऐन उन्हाळ्यात तापमान ४० पेक्षा जास्त असताना व हातातोंडाशी आलेल्या पिकाला शेवटचे पानी पाहिजे असतांनाच वीज कंपनीने चाळीसगाव तालुक्यातील जवळपास सात हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित केल्याबद्दल न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्यार्या आ.मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ शेतकऱ्यांना १२ दिवस तुरुंगात डांबून ठेवण्यात आल्याबद्दल  निषेध व्यक्त करून आज सकाळी चाळीसगाव तालुक्यातील ऋषी पांथा या तिर्थक्षेत्रावर आ.चव्हाण यांच्यासह ३१ शेतकर्यांनी महाविकास आघाडी सरकारचा फोटो ठेऊन ब्राह्मणांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने तेराव्या दिवसाचे श्राद्ध, पिंडदान करुन मुंडन केले.तसेच या तेराव्या दिवसाच्या श्राद्ध पिंडदान पुजेने या शेतकरी विरोधी तिघाडी सरकारच्या आत्म्यास जाग येऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जावेत अशी सामुहिक प्रार्थना करण्यात आली.     या सरकारला जर जाग आली नाही तर लवकरच आपण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिंगाडे मोर्चा घेऊन मंत्र्यांच्या दालना...

फैजपूर नाभिक युवा संघटनेतर्फे आघाडी सरकारचा जाहीर निषेध, बंटिभाऊ अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली दिले निवेदन

Image
फैजपूर नाभिक युवा संघटनेतर्फे आघाडी सरकारचा जाहीर निषेध, बंटिभाऊ अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली दिले निवेदन फैजपूर प्रतिनिधी : महाराष्ट्रात दि ०४/०४/२०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ व सर्व पक्षीय  नेत्यांना सोबत घेऊन झालेल्या बैठकीत लॉकडाउन ऐवजी कडक निर्बध जाहीर करीत असताना " सलून दुकाने ( केश कर्तनालये ) बंद ठेवावी " या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा आम्ही फैजपूर शहरातील व समस्त महाराष्ट्रातील नाभिक समाज जाहीर निषेध करीत आहोत. अश्या आशयाचे निवेदन फैजपूर उपविभागीय अधिकारी  तथा प्रांतधिकारी  मा. कडलग साहेब व नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. चव्हाण साहेब यांना समाजाचे प्रतिनिधी  बंटी आंबेकर यांच्यामार्फत देण्यात आले.             हातावर पोट असलेला नाभिक समाज आहे व केशकर्तन हा परंपरागत व्यवसाय असून या कारणामुळे  पूर्ण सलून व्यवसाय हा अडचणीत सापडलेला आहे.सद्यस्थितीत कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनी सलून दुकानांकडे पाठ फिरवल्यामुळे गेले वर्षभर आमचा समाज पुरता हवालदिल झाला आहे, यामुळे समस्त सलून व्यवसायिकांना (नाभिक समाजास ) दुकान भा...

शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या सरकारचं तेरावे करून मुंडन करणार-आ.मंगेश चव्हाण,आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व शेतकऱ्यांची जामिनावर सुटका

Image
शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या सरकारचं तेरावे करून मुंडन करणार-आ.मंगेश चव्हाण आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व शेतकऱ्यांची जामिनावर सुटका संदिप पाटील चाळीसगाव : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आपले आंदोलन अजून तीव्र करणार असून १२ दिवस अटकेत राहिल्यानंतर आता १३व्या दिवशी आपण शेतकऱ्यांसह मुंडन करून सत्ताधारी सरकारचा निषेध करुन तेरावं घालणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.          चाळीसगाव तालुक्यातील जवळपास सात हजार शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याबद्दल वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता यांना जाब विचारण्यासाठी गेल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या आ.मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांनी महावितरणचे अधिक्षक अभियंत्याला  दोरीने बांधल्याप्रकरणी आ.चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. काल १२ दिवसानंतर सर्वांना जामीनावर सुटका करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.         आपल्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार्या शेतकऱ्यांवर विविध गुन्हे दाखल करुन १२ दिवस तुरुंगात डांबून अट्ट...

आ.मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व शेतकऱ्यांचा जामीन मंजूर, उद्या होणार चाळीसगावला आगमन

Image
आ.मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व शेतकऱ्यांचा जामीन मंजूर, उद्या होणार चाळीसगावला आगमन खान्देश न्यूज नेटवर्क: चाळीसगाव तालुक्यातील जवळपास सात हजार शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याबद्दल वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह तीस शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अमानुषपणे तुरुंगात टाकण्यात आले होते.दरम्यान आज आमदार मंगेश चव्हाण व इतर  30 शेतकऱ्यांना जळगाव सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला असून उद्या आमदार मंगेशदादा यांच्यासह सर्व शेतकऱ्यांचे चाळीसगावात आगमन होणार असल्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, ठाकरे सरकारची सव्वा महिन्यात दुसरी विकेट

Image
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, ठाकरे सरकारची सव्वा महिन्यात दुसरी विकेट खान्देश न्यूज नेटवर्क: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुखांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पवारांनी होकार दिला. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा दिला असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ते निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार आहेत, असं मलिक म्हणाले. नैतिकतेतून राजीनामा? सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगून देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. गृहमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे दे...

मोठी बातमी : राज्यात वीकेंड लॉकडाऊन; तर कडक निर्बंध लागू होणार. काय सुरु आणि काय बंद? वाचा सविस्तर बातमी

Image
मोठी बातमी : राज्यात वीकेंड लॉकडाऊन; तर कडक निर्बंध लागू होणार काय सुरु आणि काय बंद? वाचा सविस्तर बातमी  खान्देश न्यूज नेटवर्क :   राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र 30 एप्रिलपर्यंत काही कडक निर्बंध आणले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले जाणार आहेत.  मंत्री नवाब मलिकांनी सांगितलं की, कोरोनाला रोखण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले. काही कडक निर्बंध राज्यात घालण्यात आले आहेत.  शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. तसेच नाईट कर्फ्यू देखील लागू असेल असं त्यांनी सांगितलं.  काय सुरु, काय बंद? शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन लोकल ट्रेन सुरू राहणार जिम बंद होणार अत्यावश्यक सेवांना परवनगी  रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी रात्री केवळ अत्यावश्यक सेवा...

10 दिवसांचा लॉकडाऊन?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा सुरू असल्याच्या बातम्या देत आहेत मराठी वृत्तवाहिन्या

Image
10 दिवसांचा लॉकडाऊन?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा सुरू असल्याच्या बातम्या देत आहेत मराठी वृत्तवाहिन्या खान्देश न्यूज नेटवर्क : संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात दहा दिवस लॉकाडऊन करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असून त्यात राज्यात 10 दिवस सक्तीचा लॉकडाऊन करण्यावर खलबतं सुरू आहेत, असं सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त काही मराठी वृृृत्तवाहिन्या देत आहेत. राज्यातील कोरोना संसर्गाचा कहर निर्माण झाला असून परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यात सक्तीचा दहा दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यावर चर्चा करण्यात येत आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन केल्याने त्याचे चांगले परिणाम आले आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर केल्यास कोरोना रुग्णसंख्या रोखता येणं शक्य होईल. तसेच लोकांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचीही जाणीव होईल. शिवाय मुंबई, पुण्यासारख्या शहरात होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण आणलं जाणार असल्या...

कोणत्याही क्षणी लॉकडाऊन लागण्याची शक्यता? दुपारी ०३ वाजता मंत्रीमंडळाची तातडीची बैठक

Image
कोणत्याही क्षणी लॉकडाऊन लागण्याची शक्यता? दुपारी ०३ वाजता मंत्रीमंडळाची तातडीची बैठक खान्देश न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुक्रवारी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला होता. परंतु, रुग्णवाढ अशीच झपाट्याने वाढत राहिली तर डॉक्टर आणि नर्सेस कुठून उपलब्ध करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन पर्याय नसला तरी करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्याचं सरकारने निश्चित केल्याचं समजतं.     त्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर आज दुपारी ३ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व मंत्री ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. दरम्यान, करोनाची साखळी तोडण्यासाठी ठोस उपाय मिळत नसल्यानं राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचालीही सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. ...