सचिन वाझेसोबत ओबेरॉयमध्ये येणारी ती बाई कोण?, नारायण राणेंचा रोखठोक सवाल

सचिन वाझेसोबत ओबेरॉयमध्ये येणारी ती बाई कोण?, नारायण राणेंचा रोखठोक सवाल

खान्देश न्यूज नेटवर्क: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात मिनी लॉकडाऊन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप नेते आणि खासदार नारायण राणेंनी (Narayan Rane) राज्यात लॉकडाऊन लावण्यास विरोध दर्शवलाय. तसेच सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनपासून सचिन वाझे प्रकरणापर्यंत ठाकरे सरकारवर शरसंधान साधलंय. आजची पत्रकार परिषद लॉकडाऊन, कायदा सुव्यवस्था आणि भ्रष्टाचार या तीन मुद्द्यांवर असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

सचिन वाझे नेमका कोणासाठी काम करत होता?

नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंवरही गंभीर आरोप केलेत. महिन्याला 100 कोटी जमवायचे आणि अनिल देशमुखकडे नेऊन द्यायचे ही सचिन वाझेवर जबाबदारी होती, सचिन वाझे नेमका कोणासाठी काम करत होता. जनतेच्या सुरक्षेसाठी की मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पैसे पुरवण्यासाठी काम करत होता. एनआयएच्या चौकशीतून खरी गोष्ट लवकरच बाहेर येईल. युनूस या अतिरेक्याच्या हत्येतही वाझेचा समावेश होता. एक एपीआय सचिन वाझे ओबेरॉयमध्ये राहू शकतो. तो जिथे राहायचा त्या ओबेरॉयच्या कॅमेऱ्यामध्ये एका बाईचा फोटो आहे. ती भाईंदरला राहणारी आहे. एनआयएनं तिच्या भाईंदरच्या घरीही छापा मारला. ती बाई आणि ओबेरॉयमध्ये येणारी बाई सारखीच आहे. ती बाई वाझेसोबत कोणतं काम करत होती.

वाझेचे कुलाब्यापासून अख्ख्या मुंबईभर फ्लॅट

या सरकारला एवढे दिवस माहीत नव्हतं काय? वाझेचे किती फ्लॅट आहेत माहीत नाही, मध्यमवर्गीयांना साधी चाळीत रुम घेणं अवघड आहे. पण वाझेचे कुलाब्यापासून अख्ख्या मुंबईभर फ्लॅट आहेत. अशा माणसाला खात्यात घ्यायचं काम शिवसेनेनं केलंय. वाझेला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. सुशांत सिंगपासून दिशा सालियानपर्यंत, पूचा चव्हाणपासून मनसुख हिरेनपर्यंत किती हत्या आहेत. एखाद्या गॉडफादरशिवाय पोलीस अधिकारी असं करूच शकत नाही. पोलीसच हत्या करत आहेत. किती पोलीस त्यात आहेत माहीत नाही.

लॉकडाऊन करण्यासाठी मुख्यमंत्री उतावीळ

महाराष्ट्र राज्यात कोरोना वाढतोय, त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या मनस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे मित्र पक्ष लॉकडाऊन करायला एवढे उतावीळ झालेले नाहीत. पण मुख्यमंत्री आहेत. कोरोना सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी ही घोषणा दिली. पण माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी पार पाडायला ते कमी पडले, कारण त्यांच्या घरातील पत्नी, मुलं सगळेच कोरोनाग्रस्त झाले. माझी जबाबदारी त्यांना पेलवलेली नाही. मुख्यमंत्र्यांचं धोरण चुकीचं असल्यानेच राज्यातील कोरोना कमी होण्याऐवजी वाढला.

मग महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय?

आरोग्याच्या बाबतीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, मुंबईत काय यंत्रणा आहे. वर्षभरात तुम्ही 18 हजार बेड्स उपलब्ध करून शकला नाहीत. अन्य राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली, मग महाराष्ट्रात का वाढतेय. आता व्यापारी आणि जनतेनं लॉकडाऊनला विरोध केलेला आहे. एकतर वर्षभर व्यापाऱ्यांना धंदा नाही. त्यामुळे हे सरकार आता घाबरलं आहे. शिस्त पाळा नाही तर आम्ही लॉकडाऊन करू, आता ते अशी धमकी देत आहेत, असंही राणे म्हणालेत.

मी मातोश्रीमध्ये बसतो, तुम्ही आपल्या घरात बसा

नागरिकांना, लोकांना मानसन्मान देऊन त्यांनी बोलायला हवं. आता दिवसा नाही रात्री लॉकडाऊन करणार आहेत. माणसं दिवसभरातून काम करून संध्याकाळी घरी जातात. मी मातोश्रीमध्ये बसतो, तुम्ही आपल्या घरात बसा, मग जेवायची सोय काय आपली?, तुम्ही जेवायची व्यवस्था सगळी येते. कोरोनामुळे सरकारनं नाक कापलंच, पण महाराष्ट्र राज्य आर्थिक बाबतीत मागे गेले. मुख्यमंत्री आणि या सरकारमुळे राज्य अधोगतीकडे गेलेय. लॉकडाऊन राज्याला आता पेलवणारं नाही. सगळे उद्योगपती आज कोलमडलेत, याची चिंता यांना आहे की नाही?’, असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केलाय.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व