"बालकांना सुसंस्कारांनी घडविणे बाल साहित्यिकांचे अजोड कार्य" बाल साहित्यिका सौ.माया धुप्पड यांचे प्रतिपादन

"बालकांना सुसंस्कारांनी घडविणे बाल साहित्यिकांचे अजोड कार्य" बाल साहित्यिका सौ.माया धुप्पड यांचे प्रतिपादन

[ साहित्य अकादमी पुरस्कार घोषित सुप्रसिद्ध बालकवी  आबा  महाजनांच्या सन्मानार्थ त्यांच्या  निवडक कवितांचे अभिवाचन ]
    "बालकांना सुसंस्कारांनी घडविणे बालसाहित्यिकांचे अजोड कार्य आहे. आबा महाजनांच्या जात्याच दर्जेदार साहित्याला अकादमीच्या पुरस्काराची मोहर लागली यामुळे खान्देशच्या मुला फुलांचाही सन्मान वाढलाय.आबा महाजन आज शिक्षकी पेशात  नसले तरी ते बालकांवर सुसंस्कार करणारे कालातीत अक्षय समाजशिक्षक आहेत हे पुरस्काराने सिद्ध केले." असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ.माया धुप्पड यांनी केले. 
   जळगाव प्रतिनिधी: एरंडोलकर बालसाहित्यिक आबा महाजन यांना नुकताच "आबाची गोष्ट " या बालकथा संग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाला आहे.त्यांच्या सन्मानार्थ भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव आणि संलग्न शाखा तालुका पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन आबा महाजनांच्या कवितांचा अभिवाचनाचा कार्यक्रम दिनांक १४ मार्च २०२१ रोजी संपन्न झाला त्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करतांना धुप्पड मॅडम बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षण उपसंचालक प्रख्यात कवी  शशिकांत हिंगोणकर असून प्रमुख अतिथी रंगकर्मी "आयत पोयतं सख्यानं " फेम प्रविण माळी,ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिंदे ( पाचोरा ) उपस्थित होते.
       पुढील मार्गदर्शनात धुप्पड यांनी संस्कारक्षम कविता उद्‌धृत करून  आबांची एक कवितेसह स्वलिखित " चिमणी आणि फुले " कविता सुरेल गाऊन मंत्रमुग्ध केले.दंगकर्मी प्रविण माळी (ठोंब्याच्या स्वप्नात व फोटोतले पणजोबा ) साभिनय आणि पत्रकार शिवाजी शिंदे (मी तर होणार शक्तिमान ),सुनिल दाभाडे ( चिऊताई अन् इंटरनेट ),आशा सोळुंके ( मारेल तुला छडी ),भिशी पाचोरा तालुका प्रमुख सारीका पाटील ( गणिताचे मास्तर ) भिशी तालुका प्रमुख अरुणा उदावंत ( माकडोबा आणि स्पायडर मॅन) सुष्मा पाटील ( दोस्त चार महिन्यांचा ),छाया पवार पाटील (आभासी रंग रंगला ),विजय लुल्हे  ( छडी लागसं छम छम " ही द्वैभाषिक अहिराणी ) यांनी आशय संपन्न कविता सादर केल्या.ज्योती राणे यांनी " कोकणात आपण जाऊ या " कवितेचे सुमधुर गायन केले.अध्यक्षीय भाषणात कवी शशिकांत हिंगोणेकर म्हणाले की," आबा महाजनांचे साहित्य कालसुसंगत बालमानसशास्त्र, मूल्यसंस्कारक्षम व अत्याधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे अभिजात अक्षर वाड़मय आहे.परिणामी त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीच्या मागे पुरस्कार धावत येतात.प्रत्येक तालुक्यात पुस्तकांचे गाव आणि शिक्षकांची विभागीय साहित्य संमेलने झाली पाहीजे याबबतही त्यांनी मार्गदर्शन केले.प्रस्तावनेत भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी बालसाहित्यिक आबा महाजनांचा साहित्य प्रवास, लेखन वैशिष्ट्ये सांगत पुरस्कार व प्राप्त सन्मानांचा तपशिलवार सांगितले.
        प्रस्तुत काव्य अभिवाचनातून आबा महाजन यांच्या कवितांमधील ज्ञानरंजनासह मिश्किल विनोद, चिरनुतन कल्पक चमत्कृती,मूल्यसंस्कार,जिज्ञासावृत्ती,  वैज्ञानिक कुतूहल परिपूर्तीसह हितोपदेश,बालमनातील मंत्रमुग्ध करणारा निसर्ग,गमतीच्या राज्यातील प्राण्यांचे अतर्क्य विश्व,कवितेतील नाद,ताल व लय या वैशिष्टयांवर प्रकाश टाकला.कार्यक्रमाची प्रेरणा डायट निवृत्त प्राचार्य नीळकंठ गायकवाड, निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, निवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी भैय्या पाटील,डायट जळगाव प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांनी दिली.तंत्रशुद्ध गुगल मीट व्यवस्थापन सुनिल दाभाडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी व कुमूद प्रकाशनाच्या संचालिका सौ.संगिता माळी,ज्येष्ठ पत्रकार दिपक महाले,शरद महाजन, भाईदास सोमवंशी यांनी अमूल्य सहकार्य केले. सूत्रसंचालन छाया पवार पाटील व आभार प्रदर्शन सुनिल दाभाडे यांनी केले .

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व